शिराळा नगरपंचायत, शिराळा.

ऑफिस फोन: (०२३४५) २७२ २१२, २७२ ०११

माझी वसुंधरा अभियान

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावारणीय बदल विकास मंत्रालयाचा शाश्वत उपक्रम आहे. ह्या उपक्रमाची सुरुवात सन २०२०-२०२१ पासून झाली. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचतत्वांचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने उपाययोजना राबविणे हे ह्या उपक्रमाचे उद्दिष्ठ आहे. ​

  • माझी वसुंधरा अभियान २०२०-२०२१
    RESULT- Rank 86 *
  • माझी वसुंधरा अभियान २०२१-२०२२
    RESULT- Rank 11 *

*(महाराष्ट्रातील एकूण १३० नगरपंचायतीपैकी)

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत केलेली कार्यवाही

  • शहराचे हरित अच्छादन वाढविण्याच्या दृष्टीने नगरपंचायत ने एकूण आजपर्यंत शहरात माझी वसुंधरा अभियान १ व २ अंतर्गत ८००० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
  • शहरात मियावाकी घन वन संकल्पनेवर आधारित २ घन वन प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. यामध्ये साधारणत: प्रत्येकी ४ ते ५ गुंठे क्षेत्रात १४०० वृक्षाची लागवड करून संगोपन केले जात आहे. – 1) बाय पास रोड २) सुगंधा नगर
  • मागील वर्षी बनवण्यात आलेल्या मियावाकी घन वन प्रकल्पात( सुगंधा नगर) फुल पाखरू उद्यानाची निर्मिती करण्यात आली.
  • पाणी पुरवठा कार्यालयाच्या परिसरात देशी औषधांची महत्व सांगणार्या मेडिकल पार्क (पाणी पुरवठा)ची निर्मिती करण्यात आली. यात साधारणत: १०० देशी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.
  • शहरातील प्रमुख कचरा टाकण्याचे ठिकाण म्हणून ओळख निर्माण झालेल्या नाग कट्टा येथील पडीक जागेची स्वच्छता करून त्या जमिनीला उपजाऊ बनवून त्याठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्पातील Wash Water चा पुनर्वापर करून ५५० देशी विदेशी वृक्षांची लागवड करण्यात आली. हि झाडे सध्या ते १० फुट उंचीची झाली असून हा प्रकल्प सध्या ऑक्सिजन पार्क ( नाग कट्टा ) म्हणून नावारूपास येत आहे.
  •  
  • नगरपंचायत हद्दीतील वृक्षांची (४३९३३) हेरीटेज वृक्षांची (८४) गणना करण्यात आली असून त्याबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच या वृक्षांच्या माहितीसाठी मोबाईल App (Link- https://www.thenaturefirst.com/treetracker/
    listprojects
    ) हि विकसित करण्यात आलेले आहे.
  • शहरात रोप वाटिका (नर्सरी) असून त्यात एकूण १२०००० रोपे आहेत.१) चीकुर्डेकर वस्ती २) महाजन नर्सरी ३) फोरेस्ट ऑफिस रोप वाटिका.
  • वृक्षांचे महत्व अधोरेखित करण्याच्या अनुषंगाने शहरात मुख्य रस्त्यावर असलेल्या पुरातन वृक्षास रंगरंगोटी करून सुशोभिकरण केलेले आहे.
  • घनकचरा व्यवस्थापन साठी घंटागाडी द्वारे शहरातील सर्व घनकचरा संकलित करून व विलीगीकरण करून ओल्या कच-यावर प्रक्रिया करून खत निर्मिती साठी ३० बेडचेसेंद्रिय खतप्रकल्प उभारण्यात आला आहे. तसेच ओला कचरा बायोगॅस प्रकल्पास पाठविनेबाबत कार्यवाही सुरु आहे
  • दैनंदिन तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर ओल्या कचऱ्यापासुन प्रक्रिया प्रकल्प खत निर्मिती करून हे खत शहरातील झाडांना दिले जाते तसेच शेतकऱ्यांना विकण्यात येते.
  • नागरीकानाही घरगुती स्वरूपात कचऱ्यापासुन खत निर्मिती करण्यास सांगण्यात येते.
  • दैनंदिन तयार होणारा १.५ टन सुका कचरा MRF केंद्रावर संकलित करून त्याचे पुनःश्च वेगवेगळ्या प्रकारात विलगीकरण करून तो पुनरप्रक्रियेसाठी पाठविला जातो.
  • MRF केंद्रातील निघणारे व पुनर्वापर न करता येणारे प्लास्टिक खाजगी कंपनीला EPR (Extended Producer Responsibility) अंतर्गत विकण्यात येते.
  • शहरात 100% प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदी साठी शहरातील दुकाने /आस्थापनाना वारंवार भेटी देऊन व शहरात पॅम्पलेट व स्टिकर्स  वाटून जनजागृती केलेली आहे. तसेच प्लास्टिक सापडणार्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.
  • R प्रिन्सिपल अंतर्गत टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांपासून पासून आकर्षक मत्स्याकृती आकाशकंदील बनवण्यात आला.  तसेच पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करीत असताना प्लास्टिक  बाटल्या पासूनच आकर्षक मकर बनव्यात आले.
  • ग्रामपंचायत कालीन वापर योग्य नसलेल्या घंटा गाडीचा पुनर्वापर करून त्यापासून शववाहिका बनवून नाममात्र शुल्क आकारून तीचा वापर  सुरु आहे.त्याचा शहर व पंचक्रोशीतील नागरिकांना चांगला उपयोग होत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
  • शहर पर्यावरण पूरक व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी व प्रदूषण विरहित वाहन वापरास प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी स्लो सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यात सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच नागरिकांसाठीही सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले.
  • शहरात आठवड्याचा प्रत्येक गुरुवार नो व्हेईकल डे म्हणून पाळण्यात येतो. तसेच शहरातील विविध स्तरातून नागरिकांचा यास पाठींबा मिळावा या हेतूने  या दिवशी सायकल Rally चेही आयोजन करण्यात आले.
  • साठलेल्या कचरा Legacy waste वर Bio mining प्रक्रिया करण्याचे काम करण्याच्या हेतूने प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेस पाठवण्यात आलेला आहे.
  • शहराची प्रतिमाह (सप्टेंबर ते मार्च) नियमित वायू गुणवत्ता तपासणी करून घेण्यात आली आहे.
  • शहरात सणांच्या काळात मा. सर्वसाधारण सभेच्या ठरावाद्वारे व मा. मुख्याधीकारी यांच्या अधिसुचनेद्वारे पूर्ण फटाके बंदी करण्यात आली होती.
  • शहराला ODF+ चा दर्जा प्राप्त आहे, ODF++ मानांकन मिळविण्यासाठी आवेदन सादर केले आहे. याबाबत केंद्रीय तपासणी पथकाकडून पाहणीही करण्यात आलेली आहे. तसेच शहराला स्टार मानांकन मिळण्यासाठीही आवेदन सादर केले आहे.
  • शहरात नाथ रोड व बायपास रोड या दोन ठिकाणी कि.मी. चा सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे.
  • ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात ठिकाणी मोफत चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आले आहे. समाज मंदिर , नगरपंचायत ऑफिस, पाणीपुरवठा ऑफिस, मारुती मंदिर VNM शेजारी, सुगंधा नगर पेट्रोल पंप, व्यापारी असोशिएशन, एस टी स्थानक.
  • ई-वाहनांना प्रोस्ताहन देण्यासाठी ई-वाहनांच्या विक्रेत्यांच्या सहकार्याने कॅम्प लावण्यात आले.
  • शहरातील सर्व शासकीय इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग (पाणी पुरवठा ऑफिस, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती) करण्यात आलेले आहे.
  • सांडपाणी जमिनीमध्ये जिरविण्यासाठी शोषखड्डे (नाग कट्टा) बांधण्यात आले आहेत.
  • शहरातील भूजल पातळी उंचावी म्हणून शहरातील सार्वजनिक विहिरींचे विहीर पुर्नभरण, स्वच्छता, सुशोभीकरण, व कारंजा करण्यात तसेच शहरातील तोरणा ओढा बिरोबा डोह याचे खोलीकरण, स्वच्छता व सुशोभीकरण, कारंजे करण्यात आले.
  • पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा, पाण्याच्या अपव्ययावर नियंत्रण यावे व पाण्याची बचत व्हावी या हेतूने शहरातील नळांना जल मापक यंत्रे बसवण्याची कार्यवाही सुरु आहे.
  • पाणी पुरवठा विभागाकडील मोटार पंपाच्या विद्युत बिलांमध्ये बचत करण्याच्या हेतूने APFC व MCC Panel बसवण्यात आलेली आहेत.
  • इकोफ्रेंडली गणेश मूर्ती विसर्जना करीता १० कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या अंतर्गत सुमारे ६०० गणेश मुर्तांचे विसर्जन या कुंडात करण्यात आले.
  • जनजागृतीसाठी व सुशोभीकरणासाठी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भिंती चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
  • शहरात सर्वत्र LED दिव्यांचा वापर केला जातो तसेच प्रत्येक वार्डात एकूण या वर्षात ३०८ LED तसेच १० सौर पथ दिवे बसविण्यात आले. गतवर्षी बसवण्यात आलेले ६५० LED पथदिवे  अद्यापही सुरू आहेत.
  • शहरात सार्वजनिक इमारतीवर सौर पॅनल (तहसील, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती) उभारण्यात आले आहेत.
  • #E pledge वैयक्तिक ३१७२सामूहिक ८५ घेतल्या आहेत. सर्व #upkeep केलेल्या आहेत.
  • Social Media handle (Facebook, Twiter, You Tube) वरून शहरात जनजागृती करण्यात आली.
  • नागरिकांना स्वच्छता व आरोग्यदायी आयुष्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी विविध सार्वजनिक  ठीकाणी नागरिकांच्या सहभागाने श्रमदान करण्यात येते.
  • माझी वसुंधरा अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक यांच्या सायकल, चित्रकला, निबंध, लघुपट, जिंगल, अशा विविध स्पर्धेचे आयोजन केले गेले.
  • WATER AUDIT- तहसील, पोलीस स्टेशन, नगरपंचायत, भूमी अभिलेख
  • ENERGY AUDIT- तहसील, पोलीस स्टेशन, नगरपंचायत, भूमी अभिलेख